जंगलात पेटणारा वणवा ही बाब खरंतर आपल्यासाठी नवीन नाही. अनेकदा आपण यासंदर्भात ऐकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अॅमेझॉनच्या जंगलात कित्येक दिवस धुमसणाऱ्या वणव्याने अवघ्या जगाची चिंता वाढवली होती. संपूर्ण जगाच्या अस्तित्वासाठीच आवश्यक असणाऱ्या वनसंपत्तीचा ऱ्हास हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अशाच प्रकारचे वणवे दरवर्षी भारतात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर असलेल्या राज्यांमध्ये लागल्याच्या घटना घडतात. या वणव्यांची संख्या शेकडोंनी, कधी हजारोंमध्ये देखील आढळल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात या वणव्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नेमकं असं का घडलं? वणव्यांचं कारण, प्रक्रिया आणि आकडेवारी नेमकं काय सांगते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकट्या एप्रिल महिन्याचा विचार करता हिमाचल प्रदेशमध्ये ७५० वणव्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हाच आकडा १५०० च्या घरात आहे. ३० एप्रिल या एकाच दिवशी उत्तराखंडमध्ये वणवा लागण्याच्या ५१ घटनांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही राज्यात एकाच दिवशी वणव्याच्या या सर्वाधिक घटना मानल्या जातात.

More Stories onआगFire
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason behind forest fire incidents in himachal pradesh uttarakhand pmw
First published on: 17-05-2022 at 19:24 IST