– संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौराष्ट्र आणि कच्छचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्प राबविण्याची केंद्र व गुजरात सरकारची योजना होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातील काही गावे विस्थापित झाली असती. गुजरातमधील आदिवासी बांधवांकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात येत होता. गुजरातमधील महाराष्ट्राच्या सीमेजवळील बलसाड, तापी आणि डांग या जिल्ह्यांमध्ये आदिवासींनी प्रकल्पाच्या निषेधार्थ मेळावे घेतले होते. गुजरातमध्ये या वर्षाखेर विधानसभेची निवडणूक आहे. तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पावरून आदिवासींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याची किंमत मोजावी लागू शकते. या तिन्ही जिल्ह्यांमधील भाजप आमदारांनी पक्ष नेतृत्वाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत जलशक्ती मंत्रालयाने पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पाला स्थगिती दिली. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये संमती होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती असेल, असे केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जाहीर केले. निवडणूत डोळ्यासमोर ठेवूनच गुजरातमधील भाजप सरकारने नदी जोड प्रकल्पावरून घेतलेली माघार महाराष्ट्राच्याही हिताचीच आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the par tapi narmada river linking project print exp scsg
First published on: 22-04-2022 at 08:42 IST