असे का होते?
आयुर्वेदाची चिकित्सा असे सांगते की, शीतकाळात शरीरातील कफाचे प्रमाण वाढते. तो मानेच्या वरच्या भागात, नासिकेमध्ये साचून राहतो. त्याचबरोबर या काळात तिखट, रसरशीत असे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळेही कफाची निर्मिती होते आणि साचून राहतो. तो वाहून न गेल्याने सर्दीचे रूपांतर डोकेदुखीत होते.

उपाय काय?
* सोपा उपाय म्हणजे, सकाळी उठल्यावर आणि सायंकाळी झोपताना गरम पाणी पिणे. पाण्याला उकळी आणावी. मग ते आपल्याला मानवेल असे कोमट झाले की प्यावे.
* जेवणापूर्वी अर्धे पेर आलं मीठ लावून बारीक चाऊन खावे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

यामुळे काय होते?
या उपायांमुळे साचलेला कफ वाहून जाण्यास मदत होते. तो गेल्यामुळे स्रोतस (द्रव पदार्थ वाहन नेणारा मार्ग) मोकळा होतो. कफ वाहून जायला लागला की डोकेदुखी कमी होते.

इतर काय काळजी घ्यावी?
* आहारात तीळ, गुळाचा समावेश असावा.
* तिखट बेतानेच खावे.
* दिवसातील पहिला आहार लवकर घ्यावा. तो सूर्योदयानंतर तासाभराच्या आत घ्यावा.
* या काळात घेतलेला आहार व व्यायाम वर्षभर ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे व्यायाम जरूर करावा.
वैद्य विश्वास जातेगावकर