scorecardresearch

Premium

“महाविकास आघाडी सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले, मात्र…”, जयंत पाटलांचा भाजपाला टोला

उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा सोमवारी पार पडला.

“महाविकास आघाडी सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले, मात्र…”, जयंत पाटलांचा भाजपाला टोला

राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोक प्रयत्न करत आहे. त्यांच्या या डावात आपल्याला फसायचे नाही. आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सामाजिक एकोपा जपूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा सोमवारी पार पडला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले. मात्र, सरकार आजही मजबूत आहे आणि राहणार असा टोलाही पाटील यांनी लगावला.

नवाब मलिकांवर सूडबुद्धीने कारवाई

Chandrasekhar Bawankule in Ichalkaranji
समाज घटकांनी भाजपशी सामावून घ्यावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे इचलकरंजीत आवाहन
atmaklesh yatra for 22 day at the gates of sugar mills says raju shetty
कोल्हापूर :साखर कारखानांच्या दारात २२ दिवस आत्मक्लेश पदयात्रा; ७ नोव्हेंबरला ऊस परिषद – राजू शेट्टी
Ganapati immersion in Kolhapur Ichalkaranjit Panchgange
प्रशासन, पोलिसांचा विरोध डावलून हिंदुत्ववाद्यांचे कोल्हापूर, इचलकरंजीत पंचगंगेत श्रींचे विसर्जन
Raju Shetty allegation
शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये न मिळण्यास राज्य शासन जबाबदार; राजू शेट्टी यांचा आरोप

अतिशय देखणी आणि उपयुक्त वास्तू उभारण्याचे काम येत्या काळात आपल्याला करायचे आहे. या भागातील बांधवांनी खूप मदत केली आहे. प्रत्येक निवडणुकीत साथ दिली आहे. त्याची ही छोटीशी उतराई होण्याचा प्रयत्न केला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक विभागामार्फत हे काम मंजूर करून घेतले होते. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मोठी साथ लाभली. खरंतर ते आज या कार्यक्रमात हवे होते. मात्र, सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकण्याचे काम अस्वस्थ मंडळींनी केले असल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.


मुस्लिम बांधवांसाठी प्रयत्न करणार
मुस्लिम बांधवांनी प्रगती करावी यासाठी आमचा सर्वांचाच कायम प्रयत्न राहिला आहे. या समाजातील लोक शैक्षणिक क्षेत्रातही पुढे जावे यासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणून येत्या काळात या भागातील उर्दु माध्यमिक शाळेचाही विकास करणार आहोत, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.


महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना धक्का लागू देणार नाही
आज भारतात आणि राज्यात एक विचित्र परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अल्पसंख्याक बांधवांच्या हक्कावर कोण गदा आणू पाहत आहेत याची कल्पना आपल्याला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना आम्ही कोणताही धक्का लागू देणार नाही, त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, असा स्पष्ट इशाराही जयंत पाटील यांनी दिला.


धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
कोल्हापूरच्या पक्ष मेळाव्यात आम्ही सर्वांनी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार राखण्याची शपथ घेतली आहे. कारण अलीकडे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक भोंग्यांवर बोलत आहेत, कोणाच्या तरी घरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट करत आहे. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्यावेळी आपण पुन्हा निवडून येणार नाही अशी भीती असते. तेव्हाच असे वातावरण तयार केले जाते. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केली जाते, असा टोला पाटील यांनी लगावला

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil attend inauguration ceremony of eidgah and shadikhana work in urun islampur city sangli dpj91

First published on: 10-05-2022 at 12:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×