कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे एकमत झाल्याचे एका बैठकीत दिसून आले. हद्दवाढ होण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येणार असल्याचे या वेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

कोल्हापूर शहराची स्थापना १९७२ साली झाली. त्यानंतर एकदाही हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढीचे अनेक प्रस्ताव तयार झाले; पण यथावकाश ते बासनात गुंडाळले गेले. आता पुन्हा एकदा हद्दवाढ होण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या संदर्भात नवा राजवाडा येथे खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, ज्येष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ व शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरची हद्दवाढ होण्याबाबत नेत्यांमध्ये एकमत झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.