कोल्हापूर जिल्ह्यत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी थोडी उसंत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र राधानगरी धरणातून मोठय़ा पाण्याचा विसर्ग कायम असल्याने जिल्ह्यातील पूर परिस्थिती काहीशी गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रविवारी तब्बल १ फूट ३ इंचाने वाढ होऊन नदीची पाणी पातळी ४४.९ इंचावर पोहोचली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यतील ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून पन्हाळा तालुक्यातील २०, शाहूवाडी १३, गगनबावडा ३, राधानगरी २, तर गडिहग्लज परिसरातील २ गावांचा समावेश आहे, तर ५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.

धरणातून विसर्ग वाढला

राधानगरी धरणातून वीज गृहातून २२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर कासारी धरणातून ३ हजार ९९७, कुंभी धरणातून ९५० वारणा धरणातून २५ हजार ६७० असा विसर्ग सुरू आहे. धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall stopped in kolhapur
First published on: 15-08-2016 at 02:03 IST