कोल्हापूर : वीटभट्टी,ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अवनि’ संस्थेने अल्पावधीत कार्यविस्तार केला आह़े या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देण्यासाठी संस्थेला आर्थिक बळ हवे आह़े कोल्हापूर, सांगली, सातारा परिसर हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. येथे ऊसतोड तसेच वीटभट्टी कामगारही मोठय़ा संख्येने असतात. गरीब कामगारांची मुलेही तेथेच मजुरी करतात. शिक्षणापासून दुरावलेल्या मुलामुलींसाठी ‘अवनि’ने कामाच्या ठिकाणीच शाळा सुरू केल्या. संस्थेने अशा हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पारंपरिक शिक्षणाबरोबरच या मुलांना व्यवसायपूरक प्रशिक्षणही दिले जाते. ‘अवनि ने मुलींसाठी सुमारे १२ हजार चौरस फुटांची इमारत उभारली आहे. संस्थेत मुलींचा ओघ वाढत असून ८२०० चौरस फुटांच्या विस्तारित प्रकल्पाचे काम प्रलंबित आह़े त्यात ग्रंथालय, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र, स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, अभ्यासिका, भांडार, स्नानगृह अशा विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी दानशूरांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन ‘अवनि च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे.