कोल्हापूर : देशात सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांची नाकेबंदी केली जात आहे. या विरोधात पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आवाज बुलंद केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे केले. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कॉ. भालचंद्र कांगो, विजय देवणे, स्मिता पानसरे यांची भाषणे झाली.

पवार पुढे म्हणाले, फुले, शाहू,आंबेडकर यांनी पुरोगामी विचार जपला. तो आपण सर्वांनी पुढे नेण्याची जबाबदारी निभावली पाहिजे. देशात मोठा संघर्ष उभा आहे. या विरोधात समविचारी पक्षांना, संघटना एकत्र करीत आहोत. गोविंद पानसरे यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील.

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
thorat
फुटीर आमदारांवर कारवाई; काँग्रेसने नावे जाहीर करण्याचे टाळले
cm eknath shinde
भारतीय संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांची टीका; CM शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “कसाबला…”
Masoud Pezeshkian reformist president elected by Iranian people overturning the established system will give new direction to Iran
कर्मठ व्यवस्थेस वाकुल्या दाखवत इराणी जनतेने निवडला सुधारणावादी अध्यक्ष… मसूद पेझेश्कियान इराणला नवी दिशा देतील का?
India boycott of PM speech Modi Dhankhad criticize opponents
सभात्यागामुळे सत्ताधाऱ्यांना बळ; पंतप्रधानांच्या भाषणावर ‘इंडिया’चा बहिष्कार; मोदी, धनखड यांची विरोधकांवर टीका
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Maodi ambedkar
“पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर आरोप
Kangana Ranuat and Ravi kishan slams rahul gandhi
“राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका

हेही वाचा – भाजपकडून ४०० जागा जिंकण्याचा निर्धार; शरद पवारांची खोचक टीका, म्हणाले, “त्यांनी सर्वच जागा..”

खासदार डी. राजा यांनी आज मोदी गॅरंटीची भाषा केली जात आहे पण यांनी दोन कोटी तरुणांना रोजगार, १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन कोठे विरले हे विचारले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या प्रतिगामी शक्तींना पराभूत केले पाहिजे.

माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सध्या सत्तेत असणारे राज्य घटनेमुळेच आले असतानाही ते घटनेच्या मुलभूत तत्त्वांनाच तिलांजली देत आहेत. गोविंद पानसरे यांनी पुरोगामी विचार कायम जपला असताना तो संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते आहे. विचारवंतांचे विचार आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात विस्तार करण्यावर अजित पवारांचा भर

आमदार सतेज पाटील यांनी, अमृतकालाच्या नावाखाली जातीयवादाचा विचार पेरला जात असताना तो हाणून पाडण्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.