आयपीएलच्या तेराव्या हंगामाची बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा युएईमध्ये भरवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयशी बोलताना १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल असं सांगितलं होतं. परंतू रविवारी झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलत तो १० नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी करण्यात आला आहे.
यानिमीत्ताने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा बदल घडला आहे. आतापर्यंत पार पडलेल्या १२ हंगामांचा अंतिम सामना हा शनिवार-रविवार म्हणजेच विक-एंडच्या दिवशी खेळवण्यात आला होता. मात्र पहिल्यांदाच यात बदल घडला असून तेराव्या हंगामाचा सामना हा मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.
IPL Finals
2008 – Sunday
2009 – Sunday
2010 – Sunday
2011 – Saturday
2012 – Sunday
2013 – Sunday
2014 – Sunday
2015 – Sunday
2016 – Sunday
2017 – Sunday
2018 – Sunday
2019 – Sunday
2020 – Tuesday*— CricBeat (@Cric_beat) August 2, 2020
याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 9:01 am