न्यूझीलंडविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीच्या मागे ग्रहण लागलेलं आहे. पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, तिसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय फलंदाजांची अडखळती सुरुवात झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहलही अखेरच्या सामन्यात अपयशी ठरला. ९ धावांवर हमिश बेनेटने विराटला माघारी धाडलं.

यामुळे ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत एकही शतक न झळकावण्याची विराटची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

दरम्यान विराट कोहली माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने सर्वात आधी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान लोकेशने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.