पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जल्लोषात विजय साकारण्याचे भारताचे स्वप्न आज साकार झाले. प्रग्यान ओझाची गोलंदाजी आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. इंग्लंडने डावाने पराभव टाळला असला तरी दुसऱ्या डावात ४०६ धावांपर्यंत मजल मारणा-या इंग्लंडचा भारताने नऊ गडी राखून पराभव केला. सरदार पटेल स्टेडियमवरील विजयामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत या विजयामुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.