IPL 2020 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी दमदार खेळ करत शेवटपर्यंत झुंज दिली पण त्यांना प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवता आलं नाही. त्यानंतर आता त्यांनी IPL 2021साठी त्यांनी त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना संघात कायम राखले आहे. तर काही खेळाडूंना संघातून करारमुक्त केलं आहे.

संघात कायम राखलेले खेळाडू-

विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अॅडम झॅम्पा, शहाबाज नदीम, जोश फिलीप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे

करारमुक्त केलेले खेळाडू-

ख्रिस मॉरिस, आरोन फिंच, मोइन अली, इसुरू उडाना, डेल स्टेन, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत मान, पार्थिव पटेल