आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा संघावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ‘‘खेळाडू म्हणून आम्ही काही ठरावीक गोष्टींवरच नियंत्रण ठेवू शकतो. आम्हाला वर्तमानपत्रे वाचायला मिळत नाहीत आणि वृत्तवाहिन्याही पाहायला मिळत नाही. त्यामुळे अस्वस्थ होण्याचा प्रश्नच नाही. आमचे लक्ष क्रिकेटवरच आहे आणि संघाचे नियमित वेळापत्रकाचे आम्ही पालन करतो,’’ असे धोनीने सांगितले.