पीटीआय, सिल्हेट (बांगलादेश) : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ धावबादाचा विवाद मागे टाकत महिला आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचा सलामीचा सामना शनिवारी श्रीलंकेशी होणार आहे.
भारतीय महिला संघाला नजीकच्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २००४ पासून सुरू झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने गेले पर्व सोडल्यास प्रत्येक पर्वात जेतेपद मिळवले आहे. भारताने एकदिवसीय प्रकारात चार, तर ट्वेन्टी-२० प्रकारात दोन जेतेपदे पटकावली आहेत. २०१२ पासून आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रकारात खेळवली जात आहे. २०१८च्या स्पर्धेत भारताने बांगलादेशकडून हार पत्करली. आता करोनामुळे चार वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल.
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup cricket tournament indian women team winning opening goal ysh