IND vs AUS head to head and record at Narendra Modi Stadium Ahmedabad: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी अनेक सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा येथे विक्रम चांगला राहिला आहे ,पण ऑस्ट्रेलियन संघाचा येथे भारतापेक्षा चांगला विक्रम राहिला आहे.

भारतीय संघाने १९८४ ते २०२३ या कालावधीत अहमदाबादच्या या मैदानावर एकूण १९ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ११ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले. म्हणजे विजयाची टक्केवारी ५७.८९ होती. घरच्या मैदानाप्रमाणे येथे भारतीय संघाची कामगिरी सरासरी राहिली, असे म्हणता येईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जुन्या मोटेरा स्टेडियमवर खेळले गेले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. म्हणजेच कांगारूंची विजयाची टक्केवारी ६६.६६ इतकी आहे, जी टीम इंडियापेक्षा सरस आहे.

ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
Cricket Australia Breaks Silence on Not Inviting Sunil Gavaskar For Border Gavaskar Trophy Presentation
IND vs AUS: सुनील गावस्करांचा अपमान केल्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं वक्तव्य, आपली चूक केली मान्य; नेमकं काय घडलं?
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
IND vs AUS 5 Big Reasons Why India Failed to Retain Border Gavaskar Trophy Against Australia
IND vs AUS: भारतीय संघावर १० वर्षांनी का ओढवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की? वाचा भारताच्या पराभवाची कारणं

अहमदाबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वेळा झालाय सामना –

अहमदाबादच्या या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया याआधी तीनदा भिडले आहेत. ऑक्टोबर १९८४ मध्ये दोन्ही संघ येथे पहिल्यांदा भिडले होते. कांगारूंनी हा सामना एकतर्फी ७ गडी राखून जिंकला होता. दोनच वर्षांनंतर येथे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय संघाने ५२ धावांनी विजय मिळवला. या मैदानावर दोन्ही संघांमधील शेवटचा सामना मार्च २०११ मध्ये झाला होता. तेव्हा भारतीय संघाने ५ गडी राखून विजयी झाला होता. म्हणजेच अहमदाबादच्या या मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर हेड टू हेड सामन्यांमध्ये वर्चस्व राखले आहे.

पूर्वी हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखले जायचे –

अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेले हे मैदान पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावर होते. त्याला सरदार पटेल स्टेडियम किंवा मोटेरा स्टेडियम असे म्हणले जात होते. १९८४ मध्ये येथे प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. अलीकडच्या काळात या स्टेडियमला ​​भव्य स्वरूप देण्यात आले आहे. प्रेक्षक क्षमता वाढवण्यासोबतच संपूर्ण स्टेडियमचा कायापालट करण्यात आला आहे. या नूतनीकरणानंतर या मैदानाला नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले. १ लाख ३२ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

Story img Loader