दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर (IND vs SA) भारतीय संघाला एकदिवसीय मालिका खेळायची आहे. कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराट कोहली प्रथमच वनडेमध्ये दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या भूमिकेबाबत अटकळ बांधली जात आहे. मात्र, विराट कर्णधार नसल्याने वेगळे काही करण्याची गरज नसल्याचे मत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केले.

विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्यानंतर, निवड समितीने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही वगळले आणि रोहित शर्माला वनडेचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. मात्र, रोहित शर्मा दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल कर्णधार असेल.

स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनवरील चर्चेदरम्यान, गौतम गंभीरला विचारण्यात आले की आपण नवीन कोहलीला पाहणार आहोत का? त्याने उत्तर दिले की, ”तुम्हाला नवीन काय पाहायचे आहे? कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध हक्क नाही. धोनीसारख्या खेळाडूने विराट कोहलीला कर्णधारपद दिले, तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे, त्याने तीन आयसीसी ट्रॉफी आणि चार आयपीएल ट्रॉफीही जिंकल्या आहेत.”

हेही वाचा – ‘‘त्यानं आपला अहंकार सोडावा आणि…”, विराटच्या राजीनाम्यानंतर कपिल देव यांनी दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच!

”मला वाटते की धावा करण्यासाठी विराट कोहलीला पाहावे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहता तेव्हा तुम्ही कर्णधार होण्याचे स्वप्न पाहत नाही. तुम्ही भारतासाठी सामने जिंकण्याचे स्वप्न पाहता आणि काहीही बदलत नाही, फक्त तुम्ही नाणेफेक करून क्षेत्ररक्षण करणार नाही, परंतु तुमची ऊर्जा आणि तीव्रता तशीच राहिली पाहिजे कारण देशासाठी खेळणे हा सन्मान आहे”, असे गंभीरने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका

  • पहिली वनडे – १९ जानेवारी, पार्ल
  • दुसरी वनडे – २१ जानेवारी, पार्ल
  • तिसरी वनडे – २३ जानेवारी, केपटाऊन