Gautam Gambhir’s Statement on Cricketer: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. तो म्हणाला की, “त्याला क्रिकेटर व्हायचं नव्हतं.” गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याच्या कारकिर्दीत भारताचा महत्त्वाचा भाग होता आणि अजूनही आहे. त्याने अनेक वेळा संघासाठी महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. गंभीरने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतासाठी मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. गंभीरची खेळी क्रिकेट चाहते कधीच विसणार नाही. नेमकं असं काय झालं? ज्यामुळे तो असे विधान करत आहे, जाणून घेऊ या.

माजी क्रिकेटपटू असण्याबरोबरच तो एक गोतम गंभीर खासदार देखील आहे. गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. तो अनेकदा इतर खेळाडूंबद्दल प्रतिक्रिया देत असतो. त्याचवेळी, गंभीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो की, “मला क्रिकेटर क्रिकेटर व्हायचचं नव्हतं.” त्याने क्रिकेट नसता काय झाला असता याबद्दल भाष्य केलं आहे.

KKR Captain Shreyas Iyer Revels Reason Why Sunil Narine Should Not Come To Team Meeting
IPL चा स्टार खेळाडू असूनही सुनील नरेन टीम मीटिंगमध्ये येऊ नये असं श्रेयस अय्यरला का वाटतं? म्हणाला, “त्याला अजिबात..”
viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले

‘बडा भारत टॉक शो’मध्ये गोतम गंभीरला विचारण्यात आले होते की, “तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख काय आहे?” यावर माजी सलामीवीर गंभीरने आश्चर्यकारक असे उत्तर दिले. तो म्हणाला, “मी क्रिकेटर व्हायला नको होते. मला कधीच क्रिकेट व्हायचं नव्हतं.” मात्र, गंभीरने असे वक्तव्य का केले याचा खुलासा केलेला नाही.

हेही वाचा: IND vs NEP: विराट कोहलीला मेडलच्या बदल्यात आसिफ शेखकडून हवे मेडल! सामन्यानंतरचा ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

अशी आहे गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द

गौतम गंभीर २००३ ते २०१६ या काळात भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या १०४ डावांमध्ये त्याने ४१.९५च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या ज्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या १४३ डावांमध्ये त्याने ३९.६८च्या सरासरीने ५२३८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ११ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली.

आंतरराष्ट्रीय टी२०च्या ३६ डावांमध्ये त्याने २७.४१च्या सरासरीने आणि ११९.०२च्या स्ट्राईक रेटने ९३२ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ७ अर्धशतके केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त गंभीरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५४ सामने खेळले. आयपीएलच्या १५२ डावांमध्ये त्याने ३१.०१च्या सरासरीने आणि १२३.९१च्या स्ट्राइक रेटने ४२१८ धावा ठोकल्या, ज्यामध्ये त्याने एकूण ३६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपदही भूषवले आणि संघाला दोनदा विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली.

हेही वाचा: Shahid Afridi: “पाकिस्तान सुरक्षित!”, शाहिद आफ्रिदीची जय शाहांवर टीका; म्हणाला, “तुमच्या डोक्यातील विचारांची जळमटं…”

गौतमने शुबमन गिल, तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. गंभीरला नजीकच्या भविष्यात सुपरस्टार बनण्याची क्षमता असलेल्या युवा क्रिकेटपटूचे नाव विचारले असता, त्याने अनुभवी लेगस्पिनर रवी बिश्नोईची निवड केली.