आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एका धावेने पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ टीकाकारांच्या तावडीत सापडला आहे. क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या टीमला टीकांचा सामना करावा लागत आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने संघ व्यवस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) टीका केली आहे.

सिकंदर बख्त म्हणाले की, पाकिस्तान संघ आता उपांत्य फेरीत पात्र होण्याची कोणतीही शक्यता नाही. माजी कसोटीपटू बख्त यांनीही रमीझ राजाने आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

सिकंदर बख्त यांनी जिओ सुपर टीव्ही चॅनलवरील तज्ञ म्हणून सांगितले की, “जर त्याच्यामध्ये थोडीशीही लाज असेल तर पीसीबी अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा. केवळ अध्यक्षच नाही, तर मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांनीही पायउतार व्हावे.”

हेही वाचा – IND vs SA T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ‘या’ गोलंदाजांपासून राहावे सावध, डेल स्टेनचा सल्ला

१९८३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या बख्तने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले “आम्ही नंबर वन फलंदाजाचे काय करावे? बाबर हा अव्वल फलंदाज आहे. हे मला माहीत आहे, पण त्याचे योगदान काय? तुमच्या क्रमवारीशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही.”

पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात आघाडीच्या संघाला ८ बाद १३० धावांवर रोखले होते, पण स्वत: ८ गडी गमावून मात्र केवळ १२९ धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानचा एका धावेने पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे.