Indi vs Pak Super Four match reserve day: आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा म्हणजे सुपर फोरमधील सामना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यावरही मागील सामन्याप्रमाणे पावसाचे सावट आहे. त्यामुळे याबाबत यजमान पाकिस्तानने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा सामना पावसामुळे वाया गेला, तर सुपर फोर सामन्यात एक राखीव दिवस जोडण्यात आला आहे.

१० सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर फोर सामन्यात एक राखीव दिवस जोडण्यात आला आहे. फायनल व्यतिरिक्त राखीव दिवस असणारा हा एकमेव सामना आहे. खेळण्याच्या स्थितीतील बदल पीसीबीने जाहीर केला होता, राखीव दिवसाची आवश्यकता असल्यास प्रेक्षकांना त्यांची तिकिटे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद केल्यामुळे, स्पर्धा कमी करण्याचा अर्थ असला तरी सामना मूळ दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. राखीव दिवस सुरू झाल्यास, स्पर्धेचा कालावधी पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूइतकाच असेल.

Gautam Gambhir Argument With Umpire
KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

पहिला सामना पावसामुळे गेला होता वाया –

या आशिया चषकात दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले, तेव्हा पल्लेकेले येथे पावसामुळे सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर त्याच ठिकाणी नेपाळ विरुद्ध भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पावसाचे पुनरागमन झाले, परंतु त्या दिवशी पहिल्या सामन्या इतका पाऊस नव्हता, ज्यामुळे भारताला सुपर फोरसाठी पात्र होण्यासाठी २३ षटकात लक्ष्य गाठण्याची संधी मिळाली.

हेही वाचा – Glenn McGrath: ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाजाच्या घरात घुसलेल्या अजगराने केला हल्ला, नंतर काय झालं? पाहा VIDEO

पुढील आठवड्यात कोलंबोमध्येही पावसाचा अंदाज असल्याने, स्पर्धेचे अधिकृत यजमान पीसीबी कोलंबोचे सामने हंबनटोटा येथे हलवण्याच्या विचारात होते. पण अखेरीस एसीसीने स्टेकहोल्डर्सना एक ईमेल पाठवला की हे सामने कोलंबोमध्ये मूळ वेळापत्रकानुसार खेळवले जातील.
पीसीबीने अनिच्छेने या निर्णयाला सहमती दर्शवली, परंतु निर्णय प्रक्रियेला विरोध करणारे एसीसी अध्यक्ष जय शाह यांना पत्र पाठवल्याशिवाय नाही. या चर्चेदरम्यानच पीसीबीने प्रथम खेळासाठी राखीव दिवस जोडण्याची शक्यता व्यक्त केली होती. कारण ते अधिकृतपणे आयोजित करत असलेल्या स्पर्धेतील दुसरा भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – World Cup 2023: आयसीसी वर्ल्डकपचे सचिन तेंडुलकरला मिळाले ‘Golden Ticket’, बीसीसीआयने शेअर केला खास फोटो

पाठीच्या दुखापतीनंतर जसप्रीत बुमराहचे वनडे पुनरागमन –

रविवारी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही पाऊस पडण्याचा धोका आहे आणि पावसाची ९०% शक्यता आहे. जर हवामान स्वच्छ झाले, तर भारताचा गोलंदाजी प्रमुख जसप्रीत बुमराह आपल्या मुलाच्या जन्मासाठी नेपाळविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. परंतु आता तो पुन्हा भारत-पाक सामन्यातील अॅक्शनमध्ये दिसू शकतो. कारण आता तो भारतीय संघात सामील झाला आहे. पाठीच्या दुखापतीतून नुकताच परतलेला बुमराह पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी वनडेमध्ये गोलंदाजी करू शकलेला नाही. गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने पुनरागमन केले, पण पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ न शकल्याने त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही.