भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या वन-डे सामन्याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदाता सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर पाऊल टाकलं. भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने काळी पट्टी लावलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाडकर्णी यांनी १९५५ ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध १९६८ साली खेळला होता. नाडकर्णींच्या नावावर कसोटीमध्ये एका डावात सलग २१ षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. त्यांनी १९६४ मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग २१ षटकं निर्धाव टाकली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd odi indian players were balck band to respect late indian cricketer bapu nadkarni psd
First published on: 19-01-2020 at 15:14 IST