मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ५ आफ्रिकन फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१८ पासून कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात ३ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा शमी हा एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या विजयात शमीचं महत्व हे अधिक अधोरेखित होतं. कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यानंतर शमीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात घेतलेल्या ५ बळींपैकी ४ बळी हे त्रिफळाचीत होते. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून पुण्याच्या गहुंजे मैदानात खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : भारताच्या विजयात शमी चमकला, आफ्रिकन फलंदाजांची केली दांडी गुल

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 1st test mohammad shami is the only bowler to take 3 five wicket hauls in team at second innings science 2018 psd
First published on: 06-10-2019 at 14:55 IST