अचूक गोलंदाजी आणि सलामीवीर मिताली राज व पूनम राऊत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजवर ९ विकेट्सनी विजय मिळवला.वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांना ११७ धावाच करता आल्या. डिनेड्रा डॉटिनने ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मिताली आणि पूनम यांनी ११७ धावांची सलामी दिली. विजयासाठी एक धाव हवी असताना पूनम बाद झाली, तिने सात चौकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. मितालीने ६ चौकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India women to comfortable nine wicket win against west indies women
First published on: 02-04-2014 at 03:16 IST