Indian men’s kabaddi team defeated Pakistan to enter the final: आशियाई क्रीडा २०२३ स्प पुरुष कबड्डी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने हा सामना ६१-१४ अशा फरकाने जिंकला. या विजयासह आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताचे आणखी एक रौप्य पदक निश्चित झाले आहे.

या सामन्याची सुरुवात भारतासाठी खराब झाली. पाकिस्तानने सुरुवातीला एक-एक करून चार गुणांची आघाडी घेतली होती. पण त्यानंतर भारतीय रेडर्स आणि डिफेंडर्स इतके आक्रमक झाले की त्यांनी काही मिनिटांतच पाकिस्तानच्या हातून सामना काढून घेतला. पहिल्या हाफ टाइमपर्यंत भारताने पाकिस्तानला तीनदा ऑलआउट केले आणि आघाडी ३०-५ अशी वाढवली.

Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Pakistan to host Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही? मोठी अपडेट आली समोर
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

दुसऱ्या हाफ टाइममध्येही भारतीय खेळाडूंची आक्रमक वृत्ती कायम राहिली. या हाफ टाइममध्ये भारताने पाकिस्तानला आणखी तीन वेळा ऑलआउट केले. म्हणजे संपूर्ण सामन्यात पाकिस्तानचा संघ ६ वेळा ऑलआऊट झाला. मात्र, भारतीय संघ एकदाही ऑलआऊट झाला नाही.

हेही वाचा – Asian Games: तिलक वर्माने आईला दिलेले वचन केले पूर्ण, जाणून घ्या जर्सी वर करून का केले सेलिब्रेशन? पाहा VIDEO

अंतिम फेरीत इराणशी सामना होऊ शकतो –

भारताच्या या शानदार विजयानंतर कबड्डी चाहते सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंचे कौतुक करत आहेत. कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी भारतीय चाहत्यांनीही प्रार्थना सुरू केली आहे. कबड्डीचा दुसरा सेमीफायनल सामना इराण आणि चायनीज तैपेई यांच्यात आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना या सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. कदाचित भारताची स्पर्धा इराणशीच असेल. कबड्डीत इराण हे मोठे नाव आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तो चॅम्पियन ठरला होता.

भारताने आतापर्यंत किती पदके जिंकली?

सुवर्ण: २१
रौप्य: ३३
कांस्य: ३७
एकूण: ९१