IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रकारावरून क्रिकेट विश्वात तीव्र पडसाद उमटले असून दिग्गज क्रिकेटपटूंनी पंचांच्या हलगर्जीपणावर सडकून टीका केली. विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने हा निर्णय देणाऱ्या पंचांना सुनावले. क्रिकेट आता आधुनिक झाले असून तंत्रज्ञानाचा वापर का करण्यात आला नाही? असा सवाल त्याने केला. तर केवळ गडी बाद झाल्यावरच नो बॉल न तपासता तंत्रज्ञानाचा वापर योग्य करण्यात यायला हवा, असे मत फाफ डू प्लेसी याने व्यक्त केले आहे. याशिवाय, समालोचक संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले, आकाश चोप्रा, डीन जोन्स यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. तर प्रग्यान ओझा, मोहम्मद कैफ, केविन पीटरसन, मायकल वॉन या खेळाडूंनी पंचावर टीका केली. I believe with the technology that's being used in cricket for different things what happened in the #MIvsRCB match highlighted that more should be done. A quick call from the third umpire on the #noball would have been the right way to go and must be implemented going forward. pic.twitter.com/58lGfHJKJu — Brian Lara (@BrianLara) March 29, 2019 - Technology should be used much more often in cricket . so many front foot no-balls missed all the time in all formats and only checked on dismissal. Should be as simple as 3rd umpire telling the umpire through ear piece that a no ball has been bowled. — Faf Du Plessis (@faf1307) March 28, 2019 - High quality cricket tonight. Wow! Yuvi, Hardik, Chahal, Umesh, Virat, AB, Bumrah & Malinga all taking the game to great heights, before it all came crashing down with that last ball no ball miss. Unforgivable mistake.#VIVOIPL2019 #RCBvMI — Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 28, 2019 - Since so many are bringing this up, there is currently no use of technology to help the umpire with a no-ball. It has been widely discussed but not implemented. — Harsha Bhogle (@bhogleharsha) March 28, 2019 - It would have been better if Shivam Dube was out on the last ball, seems like that is the only way umpires would have checked the #noball — Mohammad Kaif (@MohammadKaif) March 28, 2019 - What did just happened! Such a big error. could have changed the game. #noball #umpires #ridiculous #RCBvMI #VIVOIPL — Pragyan Prayas Ojha (@pragyanojha) March 28, 2019 - Malinga’s last ball was a no-ball..BIG one. Umpire missed it. Colossal error. Unbelievable. #RCBvMI #IPL — Aakash Chopra (@cricketaakash) March 28, 2019 - In the world of technology that we live in, a NO BALL like that should NOT happen! End Of Story! — Kevin Pietersen (@KP24) March 28, 2019 - In an era of so much technology and with so much at stake NO BALLS should never ever be missed .. #JustSaying #IPL2019 — Michael Vaughan (@MichaelVaughan) March 28, 2019 - Sorry.. but umpires are missing too many no balls these days.. time for another umpire on the ground to call no balls! #fedup — Dean Jones (@ProfDeano) March 28, 2019 दरम्यान, बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर ६ धावांनी मात केली. बाराव्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने १९ व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या १८ धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही. बुमराहने आजच्या सामन्यात ३ बळी घेतले. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती. मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एबी डिव्हीलियर्सने ७० धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली. त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं.पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी फटकेबाजी करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यामुळे मुंबईने आश्वासक धावसंख्या गाठली. मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.