कृणाल पंड्याच्या आक्रमक खेळीमुळे आणि १२ चेंडूंमध्ये केलेल्या ३१ धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक विजय मिळवला. त्याला कॅप्टन रोहित शर्मानेही चांगली साथ दिली. सुरुवातीलाच मुंबईचे चार गडी तंबूत परतल्यामुळे मुंबईच्या हातून सामना जातो की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र मुंबईच्या संघातील रोहित शर्मा आणि कृणाल पंड्या या दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईचा विजय सहज शक्य झाला.
ख्रिस गेल आणि के एल राहुलने केलेल्या स्फोटक फलंदाजीनंतर करुण नायर वगळता किंग्स इलेव्हन पंजाबचे इतर फलंदाज चांगली खेळी करु शकले नसल्याने पंजाब मोठी धावसंख्या उभी करु शकेल की नाही असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र अखेरच्या ओव्हर्समध्ये मॅरक्यूस याने १५ चेंडूत २९ धावा ठोकत पंजाबला मोठी धावसंख्या उभी करुन दिली. पंजाबने मुंबईसमोर विजयासाठी १७५ धावांचं आव्हान दिलं आहे.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ख्रिस गेल आणि के एल राहुलने किंग्स इलेव्हन पंजाबला दमदार सुरुवात करुन दिली. पण लोकेश राहुल २४ धावांवर आऊट झाला. यानंतर ख्रिस गेलने दमदार फलंदाजी करत ४० चेंडूत अर्धशतक ठोकलं. पण तो मोठी खेळी करु शकला नाही आणि आऊट झाला. यानंतर लगेचच युवराजने आपली विकेट गमावली. करुण नायरने १२ चेंडूत २३ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये मॅरक्यूस याने फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. मात्र हे आव्हान मुंबईने पार केले.