Virat Kohli Naveen Ul Haq Face Off Again: आयपीएल २०२३ चे ६२ सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत प्लेऑफमध्ये पोहोचलेला गुजरात टायटन्स हा एकमेव संघ आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पण प्लेऑफमधील उर्वरित तीन स्पॉट्ससाठी अनेक संघांमध्ये अजूनही लढत आहे. त्याचबरोबर या संघांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचीही नावे आहेत. पण जर हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले तर चाहत्यांना पुन्हा एकदा विराट कोहली आणि नवीन-उल-हक मैदानावर आमनेसामने सामना पाहायला मिळतील.

विराट-नवीनच नवीन आमनेसामने दिसणार –

गेल्या वेळी लखनौ आणि आरसीबीचे संघ आमनेसामने आले तेव्हा बराच गदारोळ झाला होता. सामन्यानंतर विराट कोहली आणि लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यात वादावादी झाली होती. लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीरनेही या वादात उडी घेतली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की विराट आणि नवीन पुन्हा एकदा मैदानावर एकमेकांसमोर येऊ शकतात. यासाठी लखनऊ आणि आरसीबीचे संघ एकत्र प्लेऑफचे तिकीट कसे मिळवून शकतील हे जाणून घ्या.

Mumbai Indians Can Reach Playoff of IPL 2024 Point Table
मुंबई इंडियन्स ७ सामने हरूनही गाठणार प्ले ऑफ! ४ सामन्यांमध्ये ‘असं’ जुळावं लागेल गणित, कसं आहे पॉईंट टेबल?
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे

लखनऊ आणि बंगळुरु एकत्र प्लेऑफमध्ये कसे पोहोचतील?

सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत १२ सामन्यांनंतर लखनऊचा संघ १३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे आरसीबीबद्दल बोलायचे झाले, तर हा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह ५व्या क्रमांकावर आहे. मंगळवारी लखनऊचा संघ मुंबईशी भिडणार आहे. लखनौच्या संघाने हा सामना जिंकल्यास त्यांचे १५ गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. त्याचवेळी, यानंतर १३ सामन्यांत मुंबई संघाचे केवळ १४ गुण राहतील.

हेही वाचा –

आरसीबीलाही दोन्ही सामने जिंकावे लागतील –

इतकंच नाही तर इथून मुंबईचा संघ आपल्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाशी भिडणार आहे. या सामन्यातही मुंबईचा संघ पराभूत झाला तर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. त्याच वेळी, आरसीबी आणि लखनौला मोठ्या प्रमाणात प्लेऑफमध्ये पोहोचणे सोपे होईल. मात्र यासाठी आरसीबीला त्यांच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघांचा पराभव करावा लागेल. यासह आरसीबीचे १६ गुण होतील आणि चांगल्या धावगतीने हा संघ अंतिम ४ मध्ये पोहोचेल.

पंजाब किंग्जही शर्यतीत –

आरसीबीप्रमाणेच पंजाब किंग्जलाही अंतिम ४ मध्ये पोहोचण्याची संधी आहे. हा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. पंजाबचेही केवळ दोन साखळी सामने शिल्लक असून त्यांनाही १६ गुण मिळण्याची चांगली संधी आहे. परंतु त्याचा नेट रनरेट निगेटिव्ह आहे.