Virat Kohli Cried After RCB IPL 2025 Title Win: आरसीबी आणि विराट कोहली अखेरीस आयपीएल चॅम्पियन ठरले आहेत. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आऱसीबीने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नावं कोरलं. आरसीबीने धावा डिफेंड करत उत्कृष्ट एनर्जी आणि कमालीची कामगिरी करत विजय मिळवला. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असतानाचा रडू लागला होता.

अखेरच्या षटकात आरसीबीला विजयासाठी २९ धावांची गरज असताना जोश हेझलवूड गोलंदाजीला आला. हेझलवूडने पहिले दोन चेंडू इतके भेदक टाकले की शशांक सिंगला एकही धाव घेण्याची संधी दिली नाही. हेझलवूडचे पहिले दोन चेंडू डॉट बॉल राहिले. हे दोन चेंडू होताच विराट कोहलीने तोंडावर हात ठेवला आणि आपल्या जागी जाऊन रडू लागला. विराटचे डोळे पाणावले होते आणि प्रत्येक चेंडूवर त्याच्या भावना बाहेर येत होत्या.

शशांक सिंगने पुढच्या चारही चेंडूवर चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. पण आरसीबीच्या हातून सामना निसटला होता. जसा अखेरचा चेंडू खेळला गेला आणि तो षटकारासाठी मैदानाबाहेर गेला. विराट कोहली ओक्साबोक्शी रडू लागला आणि मैदानावर गुडघे टेकून आपल्याच जागी थेट रडू लागला. मागून स्वस्तिक चिकारा आला आणि त्याने सावरलं. त्यानंतर संपूर्ण संघ आल्यावर सर्वांना मिठी मारतही विराट पुन्हा रडू लागला. या प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली ढसाढसा रडू लागला. विराट कोहलीच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू दिसले. आरसीबीने आयपीएल ६ धावांनी जिंकताच विराट कोहली स्वत:ला सावरू शकला नाही आणि तो जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि चेहरा खाली करून रडू लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो कृणाल पंड्या ठरला, ज्याने ४ षटकांत फक्त १७ धावा देत २ बळी घेतले. त्याच्याशिवाय भुवनेश्वर कुमारनेही २ बळी घेतले. यश दयाल, जोश हेझलवूड आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. फलंदाजीत विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जितेश शर्मानेही १० चेंडूत २४ धावांची खेळी केली.