Interesting Facts Of Team India : आयपीएल २०२३ अनेक खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाची टूर्नामेंट असणार आहे. आगामी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये जागा पक्की करण्यासाठी अनेक खेळाडू आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्याच्या प्रयत्न करताना दिसतील. पण एक भारतीय गोलंदाज टीममध्ये असूनही प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित करू शकला नाहीय. त्याने १० वर्षांपासून वनडे क्रिकेटचा एकही सामना खेळला नाही. अशा परिस्थितीत तो खेळाडू आता टी-२० लीग क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांनाच जोरदार उत्तर देण्यास सज्ज झाला आहे.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अनेक खेळाडूंना नॅशनल टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यानंतर या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये देशी-विदेशी दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये अनेक खेळाडूंच्या चमकदार कामगिरी करण्याच्या आशा पल्लवीत होण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट या खेळाडूंपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये जयदेवला संधी मिळाली होती. पण कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने एकाही सामन्यात प्लेईंग ११ मध्ये जयदेवला संधी दिली नाही. जयदेव १० वर्षांपासून वनडे मॅच खेळला नाहीय.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

नक्की वाचा – मॅक्यूलमच्या शतकापासून सचिन तेंडुलकरच्या ऑरेंज कॅपपर्यंत… ‘हा’ IPL इतिहास वाचून तुम्हीही व्हाल थक्क

१३ वर्षांच्या जयदेवचा आयपीएल रेकॉर्ड जबरदस्त आहे. आयपीएलमध्ये दोन वेळा ५ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी करणारा जयदेव उनादकट भारताचा एकमेव खेळाडू आहे. जयदेवने २०१३ मध्ये हा पराक्रम दिल्ली विरोधात झालेल्या सामन्यात केला होता. तेव्हा जयदेव विराट कोहलीची टीम आरसीबीकडून खेळत होता. जयदेवने त्या सामन्यात ४ षटकांमध्ये ५ विकेट्स घेतले होते. यामध्ये विरेंद्र सेहवागपासून महेला जयवर्धनेच्या विकेटचा समावेश होता. त्यानंतर २०१७ मध्ये जयदेवने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात जयदेवने हैद्राबाद विरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. जयदेवने ४ षटकांत ३० धावा देत पाच विकेट घेण्याची कमाल केली होती.