नवी दिल्ली : वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्याचे स्वप्न होते. ते आता सत्यात उतरणार आहे. या तगडय़ा लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत. एक चांगला सामना बघायला मिळेल, असा विश्वास न्यूझीलंडचा नवोदित खेळाडू रचिन रवींद्रने व्यक्त केला.

रचिनने स्पर्धेत आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. स्पर्धेत सर्वोत्तम धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो क्विंटन डीकॉकनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. ‘‘वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. स्टेडियम पूर्णपणे भरलेले असेल आणि सगळे प्रेक्षक भारतीयांच्या बाजूने असतील. यानंतरही आम्ही आमचे आव्हान राखण्याचा प्रयत्न करू,’’ असे रचिन म्हणाला.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 : आज आरसीबीसमोर राजस्थानच्या विजय रथाला रोखण्याचे आव्हान, आतापर्यंत कोणाचे राहिले वर्चस्व? जाणून घ्या
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

‘‘सामन्यामध्ये जय-पराजय हा असतोच. कोण तरी एकच संघ जिंकणार असतो. तुम्ही प्रत्येक वेळेस जिंकू शकणार नाही. सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ कसा होतो, त्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे आमचा खेळ त्या दिवशी कसा होतो यावर बरेच काही अवलंबून असेल,’’ असेही रचिनने सांगितले. रचिनने स्पर्धेत आतापर्यंत ५६५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा >>>IND vs NED: रोहित ब्रिगेडने भारताला दिली दिवाळी भेट, नेदरलँड्सवरील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी केले कौतुक

‘‘वानखेडेवर भारताविरुद्ध खेळताना आम्ही गेल्या दोन विश्वचषक स्पर्धा आठवतो. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नवर खेळलो, लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध खेळलो आणि आता वानखेडेवर भारताविरुद्ध खेळणार आहोत. ऑस्ट्रेलियाकडून आम्ही अंतिम फेरीत पराभूत झालो. २०१९ मध्ये लॉर्डसवर पुन्हा तेच घडले, आम्ही इंग्लंडविरुद्ध हरलो. यावेळी आम्ही हे चित्र बदलण्याच्या जिद्दीने उतरत आहोत. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाकडून हरण्याचा इतिहास आम्हाला बदलायचा आहे. आमच्यासाठी हा विशेष महत्त्वपूर्ण सामना आहे,’’ असेही रचिन म्हणाला.

‘‘मैदानावर जेव्हा तुमच्या नावाचा गजर होतो, तेव्हा वेगळे स्फुरण चढते. मैदानावर आपल्या नावाचा गजर व्हायला हवा हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. असे क्षण येतात तेव्हा खेळण्याचा उत्साह वाढतो आणि एक सुरेख खेळी खेळली जाते,’’ असे रचिनने सांगितले.

न्यूझीलंड संघात चांगले खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या गुणवत्तेला न्याय देत आहे. त्यामुळेच खेळाडूंच्या दुखापतींचा प्रश्न समोर येऊनही न्यूझीलंड संघ त्यावर मात करून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. संघात असलेल्या खेळाडूंच्या चांगल्या पर्यायांमुळे न्यूझीलंड संघ या उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासाचा आनंद घेत आहे, असे रचिन म्हणाला.