करोनामुळे सध्या जगभरातील क्रिकेट सामने बंद आहेत. क्रिकेटपटूंना आपल्या फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विविध क्रीडा वाहिन्या, संकेतस्थळे क्रिकेटपटूंच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यावर जोर देत आहेत. क्रिकेटपटू देखील आपल्या सहकाऱ्यांशी लाइव्ह चॅटच्या मार्फत संवाद साधत आहेत. नुकताच भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासोबत इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या. त्यावेळी रोहितने सध्या फारसा चर्चेत नसलेला एक खेळाडू पुन्हा संघात सामील व्हायला हवा, असं मत व्यक्त केलं.

IPL : “तेव्हा धोनी अंपायरशी तावातावाने भांडला अन्…”

“खूप वर्षे आंतरराष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर संघातून वगळलं जाण्याची भावना दु:खदायक असते. आम्ही नेहमी चर्चा करतो की रैना आपल्या संघात पुन्हा खेळायला हवा. तुझ्याकडे अनुभव आहेत. तसेच तू फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डिंग करण्यातही सक्षम आहेस. मी तुला खूप वर्षांपासून खेळताना बघतोय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तुझं टीम इंडियात पुनरागमन व्हायलाच हवं. आपण आपल्या हातात जे आहे ते करत राहू आणि त्या गोष्टीची वाट बघू”, असे रोहितने रैनाशी लाइव्ह चॅट दरम्यान बोलताना सांगितलं. सुरेश रैनाने आतापर्यंत ७८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्या सामन्यांत त्याने १६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. वन डे, कसोटी आणि टी २० अशा तिन्ही प्रकारांमध्ये शतक ठोकणाऱ्या मोजक्या भारतीयांमध्ये त्याचा समावेश आहे. रैनाच्या नावे टी २० मध्ये १ शतक आणि ५ अर्धशतके आहेत. IPL मध्ये रैनाची कारकीर्द अजून दमदार आहे. २००८ ते २०१९ या काळात रैनाने IPL मध्ये १९३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३७ च्या स्ट्राईक रेटने ५,३६८ धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे IPL मध्ये त्याने एक शतक आणि तब्बल ३८ अर्धशतके केली आहेत.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’