गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेतील फायनल सामना खेळला जात आहे. हा सामना सौराष्ट्र आणि महाराष्ट्र संघात होत आहे. या सामन्यात महाराष्ट्राने कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे झळकावलेल्या शतकाच्या जोरावर, ९ बाद २४८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सौराष्ट्र संघापुढे २४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

फायनल सामन्यात सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने शतक झळकावले. ऋतुराजने १३१ चेंडूत १०८ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ४ षटकार लगावले.

raj thackeray insta reel
राज ठाकरेंनी लाडक्या रीलस्टारबरोबर बनवलं पहिलं इन्स्टाग्राम रील, महाराष्ट्राला दिला खास संदेश
Chandrashekhar bawankule, bawankule claims that NCP sharad Pawar Group s all Candidates Will Be Defeated, lok sabha 2024, sharad Pawar Group, sharad Pawar Group going to Be Zero, bjp, satara lok sabha seat, election campaign, marathi news, satara news, sharad pawar, bjp state president Chandrashekhar bawankule,
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

हेही वाचा – KL Rahul Athiya Marriage: बीसीसीआयकडून केएल राहुलला मिळाली रजा; ‘या’ महिन्यात करणार अथिया शेट्टीशी लग्न

त्याचबरोबर अझीम काझीने ३३ चेंडूत३७ धावा केल्या. तसेच महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंना काही खास कामगिरी करता आली नाही.दरम्यान सौराष्ट्र संघाकडून गोलंदाजी करताना कुशांग पटेलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४३ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कर्णधार जयदेव उनाडकट, प्रेरक मंकड आणि पार्थ भुत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.