टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. या सामन्याचे मूल्यांकन करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसने धक्कादायक वक्तव्य केले आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज अदा केला. या नमाजाबाबत वकारने एका पाकिस्तानी चॅनेलशी संभाषण करताना धक्कादायक वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्यानंतर भारताचा माजी जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि प्रख्यात समालोचक हर्षा भोगले निराश झाले. या दोघांनी वकारला ट्वीटद्वारे सुनावले आहे.

रिझवानने ‘हिंदूंमध्ये नमाज’ अदा केल्याने वकारला आनंद झाला. तो म्हणाला, “रिझवानने केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याने मैदानात हिंदूं लोकांमध्ये उभे राहून नमाज अदा केली. त्यामुळे ते खूप खास होते.”

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

वकारच्या या वक्तव्यानंतर भोगले आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”वकार युनूससारख्या माणसाचे रिझवानला हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहणे त्याच्यासाठी खूप खास होते, हे म्हणणे माझ्या आयुष्यातील सर्वात निराशाजनक गोष्टींपैकी एक आहे. आपल्यापैकी बरेचजण या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. पण याबद्दल ऐकून खूप त्रास होतो.”

भोगले पुढे म्हणाले, “मला मनापासून आशा आहे, की पाकिस्तानमध्ये खेळावर खरोखर प्रेम करणारे लोक असतील आणि त्यांना या विधानाचा धोका लक्षात येईल. तेही माझ्या निराशेत सामील होतील. हा फक्त एक खेळ आहे, क्रिकेटचा सामना आहे हे सांगणे आणि लोकांना पटवून देणे माझ्यासारख्या क्रीडाप्रेमींना खूप कठीण जाईल. तुम्हाला क्रिकेटपटू हे खेळाचे राजदूत वाटतात. ते थोडे अधिक जबाबदारीने बोलतील. मला खात्री आहे की वकार या विधानाबद्दल लवकरच माफी मागेल. आपल्याला क्रिकेट जगताला एकत्र करायचे आहे, धर्माच्या आधारावर विभागायचे नाही.”

हेही वाचा – धोनीचा मराठमोळा ‘शिलेदार’! टी-२० वर्ल्डकप सुरू असताना ऋतुराज गायकवाडला मिळाली ‘खास’ जबाबदारी!

वेंकटेश प्रसादनेही वकारला फटकारले आहे. ”एखाद्या खेळात हे सांगण्यासाठी जिहादी मानसिकतेला दुसऱ्या स्तरावर नेले जाते. किती निलाजरा माणूस माणूस आहे”, असे ट्वीट प्रसादने केले आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात भारताविरुद्ध पाकिस्तानने प्रथमच विजय मिळवला. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला. पाकिस्तानी मीडियावरील वकारच्या या वक्तव्यानंतर भारतात त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.