पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तर आता सप्टेंबर महिन्यात अनेक सण आलेले आहेत. अशातच या महिन्यात सर्वात महत्वाच्या दोन मोठ्या एकादशी आल्या आहेत. पहिली एकादशी आहे ती म्हणजे अजा एकादशी आणि दुसरी म्हणजे परिवर्तिनी एकादशी. चला तर मग जाणून घेऊयात या दोन एकादशीचे महत्त्व आणि तारीख.

अजा एकादशी तारीख आणि महत्त्व

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला अजा एकादशीचा उपवास केला जातो. यावेळी हा उपवास ३ सप्टेंबर २०२१ रोजी उदयतीथीच्या मूल्यासह केला जातो.

Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

शास्त्रांमधील काही उल्लेखानुसार भाद्रपद महिन्यात येणारी ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि अश्वमेध यज्ञाची फळे देणारी मानली जाते. असे मानले जाते की अजा एकादशीच्या उपवासाने पुत्रावर कोणताही संकट येत नाही आणि गरिबी दूर होते. दरम्यान अजा एकादशीचे व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे. या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्यफलप्राप्ती होते, असे सांगितले जाते.

परिवर्तिनी एकादशी तारीख आणि महत्त्व

भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. यंदा ही एकादशी १७ सप्टेंबर २०२१ रोजी आली आहे.

भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला भगवान विष्णू शयनावस्थेत आपली कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो. म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती देखील होते, असे सांगितले जाते. परिवर्तिनी एकादशी दिनी केलेल्या व्रतामुळे पुण्य प्राप्ती होऊन सर्व पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे.