करोना विषाणूने लोकांच्या दैनंदिन जीवनात बरेच बदल घडवून आणले आहेत. प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत काहीतरी बदल करण्याची गरज आहे. आहारात काय बदल करावेत याबद्दल बरेच समज-गैरसमज पाहायला मिळतात. याबद्दल सर्वाधिक विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पीटलचे मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी दिली आहेत. पाहा व्हिडीओ- करोना काळात हळदीचं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, आईस्क्रीम खाणं टाळावं का, लसूण खाल्ल्याने करोनाचे विषाणू मरतात का यांसारख्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोजक्या शब्दांत आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी दिली आहेत.