आजच्या धावपळीच्या जीवनात आहार आणि जीवनपध्दतीत झालेल्या बदलांमुळे अनेक नवीन शारिरीक आणि मानसिक व्याधी जन्माला येत आहेत.यामुळे व्यायम आणि योगाचे महत्व वाढत आहे. सध्याच्या काळात ‘फिट’राहणे सर्वात महत्वाचे ठरत आहे. यामुळेच विविध योग शिबिरे, व्यायामशाळांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पंचसूत्रीची अंमलबजावणी केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
१. जेवण: जेवणामुळेच आपल्याला उर्जा मिळते. त्यामुळे जेवण नेहमी योग्य वेळी,योग्य प्रमाणात आहार घ्यावा. अति किंवा कमी आहार शरीरासाठी हानीकारक आहे. आहार संतूलित असणे आवश्यक आहे.
२.झोप : स्वस्थ शरीरासाठी चांगली झोप आवश्यक आहे.झोपेची कमतरता किंवा जास्त झोपेमुळे आजार बळावू शकतात.यामुळे शरीरास आवश्यक आहे तेवढीच झोप घेणे आवश्यक आहे.रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी सर्वात चांगले आहे.
३.व्यायम : आजच्या धावपळीच्या जीवनात शारिरीक श्रम कमी झाले आहे. यामुळे व्यायमाचे महत्व वाढत आहे. प्रत्येकाणे आवडीनुसार कोणताही व्यायम नियमित करणे आवश्यक आहे.योग असो किंवा शारिरीक व्यायम यांच्यासाठी काही वेळ प्रत्येकाणे राखूनच ठेवायलाच हवा.
४.व्यसन नकोच : उत्तम आरोग्यासाठी व्यसनांपासून दोन हात लांब राहणे सर्वात महत्वाचे आहे. तंबाखू,सिगारेट,विडी,दारू यासारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती आपल्या आरोग्याचे स्वता:च शत्रू असतात. या व्यसनांचे परिणाम लगेच दिसायला सुरूवात होते.
५.चांगल्या सवयी : प्रत्येकाणे आरोग्यविषयी चांगल्या सवयी लावून घेणे आवश्यक आहे. आवश्यक त्या थिकाणी स्वत:वर मर्यादा देखील घालणे आवश्यक आहे.