फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण सर्व फळे प्रत्येक ऋतूत खाऊ शकत नाहीत, कारण त्यांचे सेवन कधीकधी फायदेशीर किंवा हानिकारक असू शकते. कारण, फळे ऋतूनुसार येतात आणि ऋतूनुसार या गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याच वेळी, अशी काही फळे आहेत जी वर्षभर खाल्ली जाऊ शकतात आणि त्यांचे सेवन अनेक आरोग्य फायदे तसेच रोगांपासून बचाव करते. गुडगाव येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील पोषणतज्ज्ञ दीप्ती खतुजा यांनी अशी पाच फळे सांगितली आहेत, जी कोणत्याही ऋतूत आणि सकाळी लवकर खाऊ शकतात.

पोषणतज्ज्ञ दीप्ती खतुजा यांच्या मते, फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु काही फळे अशी आहेत जी रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरू शकतात. ही फळे केवळ पचनशक्ती मजबूत करत नाहीत तर हृदय, यकृत, त्वचा आणि मेंदू देखील निरोगी ठेवतात. खरं तर, पौष्टिकतेने समृद्ध फळांनी दिवसाची सुरुवात केल्याने शरीर दीर्घकाळ ऊर्जावान आणि रोगमुक्त राहते.

पपई (Papaya)

रोज सकाळी पपई खाल्ल्याने आतडे स्वच्छ होते आणि पचनसंस्था मजबूत राहते. पपईमध्ये पपेन हे एंजाइम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फोलेट देखील चांगल्या प्रमाणात असते. सकाळी उपाशीपोटी पपई खाल्ल्याने आतडे स्वच्छ होतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पपईचे दररोज सेवन केल्याने यकृत, पोट आणि त्वचेला फायदा होतो.

सफरचंद (Apple)

सफरचंद खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे तसेच अनेक आजारांपासून बचाव करते. सफरचंद खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे तसेच अनेक आजारांपासून बचाव करते. सफरचंद हे फायबर अँन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. रोज उपाशी पोटी सफरचंद खाल्याने पचनाक्रिया सुधारते आणि पोट साफ होते. याशिवाय मधूमेही रुग्णांसाठी सफरचंद खूप चांगले असते. सफरचंदांचे सेवन हृदयाचे आरोग्य आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करते.

केळ (Banana)

केळ एक लोकप्रिय फळ आहे जे जगभरात खाल्ले जाते. यात पोटॅशिअम, फायबर, व्हिटॅमिन बी ६चा एक चांगला स्त्रोत आहे. केळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. केळाचे सेवन करण्यामुळे पचनक्रिया सुधारते हार्टचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर केळ हे उर्जेचा स्त्रोत आहे. केळ खाल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. हे पोटातील अॅसिडिटी कमी करते.

डाळींब (Pomegranate)

उपाशी पोटी डाळींब खाल्याने अनेक फायदे होतात. डाळींब रक्त वाढवण्यासाठी सर्वात चांगले मानले जाते. रिकाम्या पाटी डाळींब खाल्याने ऊर्जा वाढते. त्वचेला फायदे मिळतात, सूज कमी होते तसेच हृदयाचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधापते. डाळींब आर्यन,अन्टीऑक्सिडेंट्स आणि पॉलीफेनॉल्सने समृद्ध असते त्यामुळे उपाशीपोटी खाल्यास रक्त शुध्द होते. शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते. तसेच हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कीवी

कीवीचे सेवन करणे इम्यून सिस्टीम बूस्ट करते. उपाशीपोटी कीवी खाल्याने मेटाबॉलिज्म अॅक्टिव्ह होते आणि शरीरामध्ये फ्री रेडीकल्सचा डीटॉक्स होतो. कीवीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अन्टीऑक्सिडेंट्सने भरपूर प्रमाणात असते. कीवी हे पचन क्रिया सुधारते.