लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योग्य आणि पुरेसा आहार घेणे गरजेचे असते. यामुळे पालकांना नेहमी त्यांच्या मुलांच्या जेवणाची काळजी सतावत असते. कोणताही पौष्टिक पदार्थ दिला तर लहान मुलं लगेच टाळाटाळ करतात किंवा भूक नाही असं जाहीर करतात. पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने त्यांचे प्रयत्न काही थांबत नाहीत. मग धाक दाखवून, वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ खाऊ घातले जातात. मुलांसाठी पालकांना अशी बऱ्याच बाबतीत मेहनत घ्यावी लागते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांना काय काय खायला द्यायचे याची यादीचं काही जण तयार करतात. दिवसभर मुलांमध्ये एनर्जी राहावी यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्वाची भूमिका बजावतो. आरोग्याच्या दृष्टीने मुलांच्या नाश्त्यामध्ये कोणकोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा