प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने सुसंस्कृत व्हावे असे वाटते, परंतु पालकांच्या अति लाडामुळे मुले अनेकदा हट्टी बनतात आणि हट्टी मुलांना हाताळणे स्वतः पालकांसाठी आव्हान बनते. मुलं हट्टी असणं हा फक्त त्यांचाच दोष आहे असं नाही. यामध्ये मुलाच्या पालकांची मुख्य भूमिका असते. अशा स्थितीत मूल जर जास्तच हट्ट करू लागले तर त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्याला भविष्यात मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते. जर तुमचे मूलही हट्टी होत असेल तर आज आपण, मुलाशी कसे वागावे याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया.

  • मुलांचे ऐका

बर्‍याचदा पालक आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु असे केल्याने मूल आपले म्हणणे मांडण्याचा आग्रह धरू लागते. हळूहळू ही त्याची सवय होऊन जाते. म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे आहे. वाढत्या मुलांना त्यांचे म्हणणे सांगण्यासाठी त्यांच्या पालकांशिवाय दुसरे कोणीही नसते. म्हणूनच त्यांना त्यांच्या गोष्टी त्यांच्या पालकांसोबत शेअर करायच्या असतात.

374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक
shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
  • योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्ट करा

वाढत्या मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य याची समज नसते. अशा परिस्थितीत मुलांकडून चूक झाली की पालक त्यांना ओरडून किंवा मारून गप्प करतात. असे केल्याने मुलाच्या आत मनात निर्माण होतो. अशा वेळी मुलाला ओरडण्यापेक्षा किंवा मारण्याऐवजी त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगा.

  • स्वतःवर नियंत्रण ठेवा

मोठी होणारी मुले खूप खोड्या करतात. अशा वेळी आई-वडील त्यांच्यावर रागावतात आणि कधी-कधी त्यांना मारतातही, पण असे केल्याने मुलांमध्ये राग आणि चिडचिड वाढते. म्हणूनच पालकांनी स्वतःवर संयम ठेवणे आणि मुलावर न रागावणे महत्वाचे आहे. मुलाला बोलण्याची संधी दिली पाहिजे. त्याच वेळी, पालकांनी मुलाचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याला फटकारण्याऐवजी त्याच्या मुद्द्याला योग्य उत्तर देणे महत्वाचे आहे.