पावसाळ्यात घराबाहेरील झाडांवर बुरशी किंवा चकत्यांचा प्रार्दुभाव वाढतो. यामुळे झाडांची पानं लवकर पिवळी पडून गळू लागतात, किंवा मुळापासून कमजोर होतात. यावेळी लवकरात लवकर उपाय करुन तुम्ही झाडांचे संरक्षण करु शकता. पण असे न केल्यास तुमची हिरवीगार दिसणारी झालं पूर्णपणे खराब होतात. अनेकदा झाडांवर पांढऱ्या रंगाचा एक खराब थर दिसून येतो, ज्यामुळे झाडांसह मातीची खत क्षमता कमी होऊ शकते. पाण्याचा अति वापर, हवामानातील बदल यामुळे देखील झाडांवर बुरशीजन्य संसर्ग वाढू शकतो. पण हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला काही उपाय फॉलो करावे लागतील. हे उपाय कोणते जाणून घेऊ…

झाडांना बुरशीजन्य रोगांपासून दूर ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

१) कडुलिंबाची फवारणी

दोन चमचे कडूलिंबाचे तेल दोन लिटर पाण्यात चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. यानंतर एका स्प्रे बाटलीत भरून नंतर ते मातीवर आणि झाडांवर स्प्रे करा.

२) ऍपल सायडर व्हिनेगर स्प्रे

एक लिटर पाण्यात दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा. यानंतर ते स्प्रे बाटलीच्या साहय्याने बुरशीजन्य पानांवर आणि देठांवर स्प्रे करा.

३) लिक्विड सोप स्प्रे

झाडांवरील बुरशी दूर करण्यासाठी अर्धा चमचा लिक्विड सोप, एक चमचा बेकिंग सोडा दोन लिटर पाण्यात मिसळून स्प्रे करा, यामुळे देखील झाडांवरील बुरशी दूर होते.

४) हळद पावडर स्प्रे

दोन ते तीन ग्रॅम हळद पावडर एक लिटर पाण्यात मिसळून ते झाडांवर स्प्रे करा. बुरशी आणि मुंग्यांचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांसाठी हा प्रभावी उपाय आहे.

५) दालचिनी स्प्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दालचिनी पावडर दोन प्रकारे वापरली जाऊ शकते, प्रथम ती थेट जमिनीत मिसळता येते. दुसरे म्हणजे ती ४८ तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर स्प्रे बाटलीत भरून पानांवर आणि देठांवर शिंपडा.