प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते. मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता असे मानले जाते. या वर्षी, कालभैरव जयंती २७ नोव्हेंबर, शनिवारी येत आहे. या दिवशी भगवान भैरवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत. या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते. यानंतर रात्री संपूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केली जाते.

काळभैरव जयंतीनिमित्त पूजन केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते. त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमीच शिक्षा देतात, अशी धारणा आहे. एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो, त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही, असेही सांगितले जाते.

pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष अष्टमी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु होते. शनिवारी पहाटे ०५.४३ ते २८ नोव्हेंबर २०२१ रविवारी सकाळी ०६.०० पर्यंत राहील. काळभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून पूजा केली जाते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी, असे मानले जाते. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावा आणि त्यांची मनोभावे पूजा करा. देवाला फुले, इमरती, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करा. यानंतर भगवंताच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालीसाचा पाठ अवश्य करावा. पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी. तसेच, अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी.