सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी हा ग्रह सर्वात महत्वाचा मानला जातो. कर्माचा दाता शनी देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी सर्वात कमी गतीने चालतो, त्यामुळे शनी ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. आता पुढील राशी परिवर्तन २९ एप्रिल २०२२ रोजी शनी ग्रहाद्वारे होणार आहे. या काळात शनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीचा कुंभ राशीत प्रवेश जवळपास ३० वर्षांनी होणार आहे.

या राशींवर शनी साडेसती आणि धैय्या सुरू होतील : शनीच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या लोकांवर शनी साडेसती सुरू होईल, त्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशींवर धैय्या सुरू होतील. शनीच्या राशी बदलामुळे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनिधाऱ्यापासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे धनु राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होईल.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

आणखी वाचा : Venus Transit 2021: मकर राशीत प्रवेश करणार शुक्र, या ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

या राशींवर शनीची वाकडी नजर असेल: २९ एप्रिलनंतर, १२ जुलै २०२२ रोजी शनी ग्रह पुन्हा एकदा राशी बदलेल आणि तो प्रतिगामी अवस्थेत मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनी मकर राशीत राहील. मकर राशीत शनीच्या प्रवेशाने धनु राशीच्या लोकांवर पुन्हा एकदा साडेसाती सुरू होईल, तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर धैयाचा प्रभाव राहील. अशा प्रकारे पाहिल्यास धनु, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या दशातून २०२३ मध्येच पूर्ण मुक्ती मिळेल.

आणखी वाचा : Vastu Tips : लग्न उशीरा होण्याचं कारण असू शकतं वास्तुदोष, या उपायांनी दोष दूर करा

शनी साडेसातीचे तीन चरण आहेत. पहिल्या टप्प्याला उदय टप्पा म्हणतात, या टप्प्यात मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. दुसऱ्या टप्प्याला शिखर टप्पा म्हणतात, ज्यामध्ये शनी साडेसाती शिखरावर आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनी साडेसातीची ही सर्वात वेदनादायक अवस्था मानली जाते.

आणखी वाचा : Corona : तुमच्या मुलांना सुद्धा सुई लावून घेताना भीती वाटते का? त्यांना कसं करायचं तयार? जाणून घ्या

त्याच वेळी, तिसऱ्या टप्प्याला अस्त फेज म्हणतात. यामध्ये शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊ लागतो. असे मानले जाते की या चरणात शनी व्यक्तीला त्याची चूक सुधारण्याची संधी देतो.