3 fruits manage blood sugar: आजच्या धावपळीच्या जीवनात चांगले आरोग्य राखणे अधिकाधिक आव्हानात्मक बनले आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव व अनियमित दिनचर्या यांमुळे लठ्ठपणा, हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्या वाढत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी आहार आणि जीवनशैली राखल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. रक्तातील साखर ही एक अशी समस्या आहे, जी एकदा विकसित झाली की, ती नियंत्रित करणे खूप कठीण होते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीराचे अवयव हळूहळू कमकुवत होतात आणि त्यामुळे गंभीर आजारदेखील होऊ शकतात. मधुमेहींना गोड पदार्थ, पॅकेटबंद ज्यूस किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, अशी काही फळे आहेत, जी मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात आणि त्यांना त्यांचे फायदेदेखील मिळतात. आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ दिव्या गांधी यांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम फळांची यादी केली आहे, जी रक्तातील साखरेची पातळी वाढवणार नाहीत आणि असंख्य आरोग्यदायी फायदेही देतील. तुमच्या आहारात काही निवडक फळांचा समावेश करावा. त्यांच्या मदतीने साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहतेच; परंतु अनेक आजारांनाही प्रतिबंधित केले जाते.

पपई

पपईमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे शरीराच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. या फळात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांचे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. पपईचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील जळजळ कमी होते. विशेष बाब म्हणजे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. हे फळ पचन सुधारते, बद्धकोष्ठता आणि पचन समस्या कमी करते.

जांभूळ

मधुमेह असलेल्या लोकांसाठी जांभूळ हे वरदान मानले जाते. त्याचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून रोखतो. त्यात जांबोलिन व जांबोसिन या नावांची संयुगे असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि इन्सुलिनचे कार्य सुधारण्यास मदत होते. दररोज एक लहान वाटी ???बेरी??? खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत करतात.

नाशपाती

नाशपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी चांगले असते. हे फळ खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळता येते आणि वजन कमी होण्यास मदत होते. नाशपातीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते.

सफरचंद

सफरचंदामध्ये फायबर आणि पेक्टिन असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ते शरीरातील इन्सुलिनचे कार्यदेखील सुधारते. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमदेखील भरपूर असते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासही मदत मिळते.