भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com
आजवर कधीही कल्पना न केलेले जग करोना महासाथीमुळे आपल्याला पाहावे लागले. कामधंदा बंद, मुलांच्या शाळा, मैदाने, बागा बंद, बाजारपेठा, उद्योग, वाहतूक सगळं काही ठप्प. करोना महासाथीतून मार्ग काढण्यासाठी नाइलाजाने किंवा मनाविरुद्ध का होईना, आपण र्निबध स्वीकारले. सरकारने घालून दिलेले नियम पाळले. रुग्णसंख्येतील चढउतारांसह कधी सैल तर कधी घट्ट होत जाणारा र्निबधांचा फास संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. पण, जीव वाचवण्याच्या काळजी आणि भीतीने ते र्निबध सर्वानीच आपलेसे केले. ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या प्रकारामुळे आलेली तिसरी लाट आली तशीच वेगाने ओसरलीसुद्धा. त्यामुळे नाही म्हटले तरी सर्वसामान्य माणसांसह सरकार, यंत्रणा आणि प्रशासन या सगळय़ांना दिलासा मिळाला. तशातच, आता केंद्र सरकारने करोना प्रतिबंधासाठी घालून दिलेले र्निबध मागे घेण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. दोन वर्षे सतत कमी- अधिक र्निबधांच्या सावटाखाली जगल्यानंतर र्निबध उठवले जाण्याची साधी शक्यताही अत्यंत चैतन्यदायी वाटावी, अशी स्थिती आहे. मात्र, संसर्ग आटोक्यात आलेला असला तरी करोना विषाणूतील उत्परिवर्तनांची प्रक्रिया ही पुढील काही काळ सातत्याने सुरू राहण्याची शक्यता आहे. वरवर पाहता अत्यंत सौम्य असलेला ओमायक्रॉनचा संसर्ग लसीकरण न झालेल्या आणि जोखीम गटातील रुग्णांसाठी गंभीर रूप धारण करणारा ठरला हे तिसऱ्या लाटेच्या काळात आपण पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात सध्या असलेले करोना र्निबधही आता उठवण्यात यावेत अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना दोनच दिवसांपूर्वी दिल्या आहेत. आसाम, तेलंगाणा, हरयाणा येथील राज्य सरकारांनी राज्यातील सर्व करोना र्निबध हटवले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वाचे, विशेषत: व्यापार उद्योग क्षेत्राचे लक्ष लागलेले असणे साहजिक आहे.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus covid 19 lockdown unlock coverstory dd
First published on: 19-02-2022 at 00:47 IST