‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा लेख नरहर कुरंदकरांनी १९६९ साली लिहिलाय. त्यावेळी त्यांचे वय ३७ वर्षांचे होते. याच- दरम्यान ते विविध विषयांवर लिहीत होते आणि इतर विषयांप्रमाणे शिवाजीमहाराजांवरही ठिकठिकाणी व्याख्यानं देत होते. त्यावेळी रेकॉर्ड केलेले एक भाषण २०१० साली मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकायला मिळाले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ६९-७० च्या दरम्यान केलेल्या त्या भाषणानंतर काही वर्षांनी जे पुस्तक आले, त्यातले त्यांचे विवेचन त्या भाषणापेक्षा खूपच वेगळे होते. म्हणजे कुरुंदकर जरी असले, तरी तेही चुकीच्या गोष्टी कवटाळून बसू शकतात! अर्थात नंतर पुस्तकाच्या रूपाने त्यांनी स्वत:ची मतं दुरूस्त करून घेतली, हे स्वागतार्हच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुनर्विचारासाठी सतत तयार असणे हे कुरुंदकरांचे वैशिष्टय़. त्यामुळे ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ याही लेखाचा पुनर्विचार पुढच्या काळात त्यांनी नक्की केला असता असे वाटते. प्रत्येकाचा विकास असतो आणि या विकासाला टप्पे असतात, हे कुरुंदकरांचे मत मान्य होण्यासारखेच आहे. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. त्यामुळे आपल्या वैचारिक व एकूणच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. आजही अनेक प्रश्नांवर कुरुंदकर नव्याने काय म्हणाले असते, असा विचार राहून राहून मनात येतो.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comment on narahar kurundkars article on ambedkar dalits and buddhism
First published on: 28-04-2013 at 12:05 IST