जनतेसाठी नरेंद्र मोदी आशेचा किरण आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे व घराणेशाही रोखण्याचे काम ते करत आहेत. अशीच त्यांची पावले पडत राहिल्यास ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, चाव्या जनतेच्या हातात  आहेत अशी टिप्पणी अण्णांनी राज ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर केली.