देशामध्ये करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. याअंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार असून, केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यांकडून लस खरेदी करण्यास मुभा दिली आहे. या निर्णयाचं राज्यातील ठाकरे सरकारनेही स्वागत केलं आहे. असं असतानाच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. यासंदर्भातील एक ट्विट केदार शिंदे यांनी केलं आहे. Photos : गुजरातमध्ये मशिदीतच उभारलं ५० बेड्सचं कोव्हिड सेंटर 'रमजानच्या महिन्यात यापेक्षा अधिक दुसरं कोणतं पवित्र काम करता येईल," अशा शब्दांमध्ये ट्रस्टींनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.#CoronaVirusUpdates #COVID19 #vadodara #mosque #Ramazan — LoksattaLive (@LoksattaLive) April 20, 2021 राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य झाल्याचा उल्लेख केदार शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. "राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?," असं शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच राज यांचा उल्लेखही शिंदे यांनी, "या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा", असा केलाय. @RajThackeray आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या!! "अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही" या काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव "राजा" @mnsadhikrut pic.twitter.com/9YJ4EhgbOt — Kedar Shindde (@mekedarshinde) April 19, 2021 काही दिवसांपूर्वीच लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल अशी आशाही राज यांनी व्यक्त केली होती. To increase the number of vaccines, I appealed to the PM to allow institutes like Haffkine to begin production. The PM graciously granted permission to Haffkine. I stand in deep gratitude and look forward to a constant support from the Center to overcome this pandemic.@PMOIndia — Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021 मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून, तसा निर्णय घेण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलत १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल. लशीचा पुरवठा वेळच्या वेळी होत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.