मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत करोना व्हायरसमुळे सर्वाधिक खराब स्थिती असलेल्या भागांमध्ये धारावीचा समावेश होतो. धारावीमध्ये आज नव्या ३६ रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये मागच्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही. ही दिलासा देणारी बाब आहे.

– राज्यात आज २५९८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली

– राज्यात एकूण संख्या आता ५९५४६ झाली आहे.

– आज नवीन ६९८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

– एकूण १८६१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

– राज्यात एकूण ३८९३९ अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.

– धारावीमध्ये आज नव्या ३६ रुग्णांची नोंद झाली.

– धारावीत करोना रुग्णांची संख्या १६७५ पर्यंत पोहोचली आहे.