भुसावळ यार्डात शनिवारी सकाळी मालगाडीचे चार डबे घसरल्याने नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक अशीच ठप्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या ठप्प झाल्या असून, अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मालगाडीचे डबे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून, दुपारपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.