करोनाशी आपण दोन हात करतो आहोत. सगळेच आपल्या परिने आम्हाला सहकार्य करत आहेत. मात्र सध्या राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केलं. रक्तदान केल्याने करोनाचा कोणताही धोका नाही. मात्र रक्तदान करतानाही फार गर्दी करु नका असंही त्यांनी म्हटलं आहे. या शिवाय गरज पडल्यास महाराष्ट्राच्या सीमाही बंद करु जेणे करुन हे संकट टाळता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी हा संवाद साधला आहे.

आणखी वाचा- Coronavirus: “रस्त्यावर वाहने आणू नका अन्यथा…”, उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

सध्या आपल्या राज्यात १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. मात्र आपल्या परिने रक्तदान सुरु ठेवा. सामाजिक अंतर राखूनच रक्तदान करा असंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. रक्तदान करताना कोणताही संसर्ग होणार नाही याचीही काळजी घ्या असंही त्यांनी म्हटलं आहे.