राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून तो मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगली येथे व्यक्त केले. जत पूर्व भागासाठी व आटपाडी तालुक्यात पिण्याचे पाणी देण्यासाठी ७३ कोटी रुपये देण्याबाबत कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कै. गुलाबराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरप्रसंगी आयोजित सहकार मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम होते. केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून तो मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगली येथे व्यक्त केले.

First published on: 22-01-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2200 crore development work purposes in drought area